संत गजाननाची पालखि पंढरपुरच्या वाटेवर!!

02 Jun 2025 17:45:17
शेगाव,
Palkhi ceremony श्री क्षेत्र शेगांव ते श्री क्षेत्र पंढरपूर .व श्री क्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र शेगाव अशी जवळपास दोन महिने संत गजानन पायीबारी श्रींचा पालखी सोहळा उत्सव साजरा होत आहे. या पायी पालखी वारीत दररोज अंदाजे 25/30 कि. मी. पालखी तील वारकरी पायी चालतात ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करुन पहाटेच चालायला सुरवात करतात.
 वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ।। १ ।।
आषाढी कार्तिकी। सदा नाम गाय मुखी ॥ ३ ॥
जाय नेमें पंढरीशी । चुकोनेदी तो वारीसी ।। २ ।।
एका जनार्दनीं करी वारी। धन्य तोचि बा संसारी ।। ४ ।।
 असा अभंग पंढरीच्या वारीची महिमा सांगतांना श्री संत एकनाथ महाराज यांनी अंभग लिहिला आहे.
 
 

palkhi Shegao 
 
 
श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव यांची पालखी शेगांव येथून सोमवार दि.०२/०६/२०२५ रोजी निघाली. श्रींच्या पालखी सोबत ७०० वारकरी मंडळीसह २ अश्व व ९ वाहने आहेत. वारकरी मंडळी करीता ॲम्बुलन्स गाडी डॉक्टर व सहकार्यासह आहे. याव्दारे श्री पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारकरी मंडळी करीता औषधोपचार केल्या जातो. वारकरी मंडळी करीता पाणी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था आहे.
 
श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि.०४/०७/२०२५ ला पोहचेल. श्रींची पालखी ज्याठिकाणी मुक्कामी आहे. त्या ठिकाणी रात्री कीतर्नाचा कार्यक्रम होईल. तरी भाविकांनी कीर्तन श्रवणाचा व श्रींचे दर्शनाचा लाभ घ्यावा. श्रींचे पायीवारी पालखी सोहळ्याचे हे ५६ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीचा श्री क्षेत्र पंढरपूर येथे (चतुर्दशी) चौदस पर्यंत मुक्काम असतो व काला करून श्रींची पालखी पौणिमिला परतीच्या प्रवासाला सुरूवात करते. गांवोगांवी श्रींचे पालखीचे स्वागत मोठ्या श्रध्देने, भक्तीभावाने, उत्साही वातावरणामध्ये केल्या जाते. अन्नदान खुप मोठ्या प्रमाणावर होते.Palkhi ceremony श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी मुक्कामी असतांना श्री संस्थानच्या वतीने नवमी, दशमी, एकादशी व व्दादशी (बारस) ला जवळपास ३ लाखाचे वर वारकरी भक्तांना महाप्रसाद मिष्टान्नासह वितरीत करण्यात येतो. संस्थेच्या नियमाप्रमाणे भजनी साहित्य जसे १० टाळजोड, विणा, मृदंग, हातोडी व संत साहित्य श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत व श्री तुकाराम महाराज गाथा दिल्या जातो. आजपावेतो महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, तेलगंणा या ९ राज्यातील ७९ जिल्हयांमध्ये आजरोजी २०,४८६ (वीस हजार चारशे शहाऐंशी) गावांना भजनी साहित्य वितरण करण्यात आले आहे व अखंड ही सेवा सुरू आहे श्रींची पालखी वेगवेगळ्या ९ जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगांव ते पंढरपूर पायी प्रवास ३३ दिवसाचा ७५० कि.मी. चे अंतर पार करेल.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0