वर्धा,
Santosh Shegaonkar नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी विजय देशमुख आणि वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी अतिक्रमण हटावची हाती घेतलेली मोहीम अभिनंदनीयच आहे. गेल्या दोन दिवसांपासुन मोकळे झालेले रस्ते पाहून हाच का तो चौक असे म्हटल्या जात आहे. अनेक वर्षांपासुन ‘बाबा’च्या आशीर्वादाने हे मजबूत अतिक्रमण सुरू होते. या अतिक्रमणधारकांना वीज मिटरही मिळाले होते, या प्रश्नाचे उत्तरही शोधावे लागणार आहे.

वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठ अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. तत्कालीन नप अभियंत्यांच्या कृपेने बांधकामात मंजुरी एक आणि बांधकाम दुसरेच झाल्याने ते अनधिकृतच म्हणावे लागेल. एका मजल्याची मंजुरी घेऊन तीन मजलेही बड्या व्यापार्यांनी उभे केले आहेत. निर्मल बेकरी चौकात सहज फिरले की अतिक्रमणाचा अंदाज येतो. सराफा लाईनमध्ये तर एका शोरूमचा मागचा भाग नगर पालिकेच्या बोळीवर उभा आहे. Santosh Shegaonkar एकंदरीत हे सर्व सुरू असताना रस्त्यावर उभे राहून पोट भरणार्यांवरच गजराज चालला. रस्त्यावर हातगाड्या लावून व्यवसाय करणार्यांमुळे वाहतुकीला अडसर होतो, भांडणाचे प्रमाणही वाढले असुन चाकू काढण्यापर्यंत विषय पोहोचला आहे. गोलबाजार तर हातगाडीवर भाजी विकणार्यांनी वेढून घेतला आहे.
मुख्य बाजारात जाण्यासाठी रविवारी रस्ता शोधावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर हातगाडी उभी करून भाजी विकणार्यांच्या विरोधात बाजारपेठेत रोष होता. अनेक मोठ्या दुकानांचे रस्ते या छोट्या भाजी, फळं विक्रेत्यांनी अडवला होता. पत्रावळी चौकातील नगर पालिकेची शाळेच्या भीतींवरही फाटे टाकून दुकानं लावण्यात आली होती. त्यामुळे अतिक्रमण आणि हातगाड्या उचलने गरजेचे होते. वर्षातून दोन वेळा या दुकानांवर अतिक्रमण हटावचा गजराज चालायचा पण तो थोड्या अंतरावरून! धका न लागत अतिक्रमण काढण्यात येत होते. Santosh Shegaonkar बाजारपेठेत वाढत असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण आणि हातगाडीवर भाजी, फळं विकणार्यांना ‘बाबा’चा आशीर्वाद असल्याची चर्चा आता बाजारपेठेत खुलेआम सुरू झाली आहे.
नगर पालिकेच्या शाळेला लागून असलेल्या अस्थाई दुकानदारांना मिटरही देण्यात आले होते. सामान्य नागरिकांना मिटर देताना वीज वितरण कंपनी कायद्यावर बोट ठेवते. कागदपत्रांशिवाय मिटर दिल्या जात नाही. मग, या अस्थायी दुकानदारांना मिटर कसे दिल्या गेले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. Santosh Shegaonkar विेशेष म्हणजे दोन दिवसात काढण्यात आलेल्या अतिक्रमणातील मिटर काढण्यात आले असले तरी कनेशनचे वायर तसेच गुंडाळून ठेवण्यात आल्याने कधीही वीज पुरवठा घेता येणे शय आहे. आता हे अतिक्रमण काढताना ज्याच्या ताकदीवर आजपर्यंत छोटे दुकानदार व्यवसाय करीत होते तो नेकमा कुठे गायब झाला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. ज्यांच्या हातगाड्या उचलल्या त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा नगर पालिकने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
चॅलानची जरा घाईच
शहरातील वाहतुकीला आळा घालणे ही सर्वात मोठी कसरत आहे. वाहतूक निरीक्षक शेगावकर यांनी त्यावर लक्ष केंद्रीत केले. पुन्हा पी १, पी २ ची अमलबजावणी सुरू केली. मात्र, त्या संदर्भात वाहनधारकांना आगवू सुचना दिल्या गेली नसल्याने दुचाकी चालक अनभिज्ञ आहेत. Santosh Shegaonkar शहरात चारचाकी लावायला जागाच नाही, अशावेळी चार चाकी लावायच्या कुठे असे अनेक प्रश्न असताना वाहतूक नियंत्रक पोलिसांनी थेट चालानच फाडण्याचा लावलेला धडाका जास्त होत असल्याचीही प्रतिक्रिया बाजारपेठेत उमटत आहे. अतिक्रमण काढण्याविषयी समाधान व्यत केले जात आहे.