घोराड,
Crowd of farmers in agriculture center मृग नक्षत्र ७ जून रोजी म्हणजे अवघ्या तीन दिवसात सुरू होत असून या नक्षत्रात येणार्या पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी पीक पेरणीचे नियोजन करतात. कृषी विभागाच्या पीक पेरणीनुसार सेलू तालुयात ४८ हजार ५९५ हेटर मध्ये खरिपाची पेरणी होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. शेती व्यवसाय भावबाजी मुळे परवडत नसल्याची ओरड होत असली तरी शेतकरी खरीप हंगामासाठी तयारी करीत आहे. पावसाने उसंत दिल्याने शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला असून खरीप हंगामाला लागणार्या पैश्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकर्यांनी घरी असलेला शेतमाल बाजारपेठेत विक्रीस आणले आहे. त्यामुळे कृषी मंडीमध्ये धान्याची आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

कपाशीचा पेरा अधिक राहणार असल्याचे सांगितले जात असताना सोयाबीन पिकाने सलग दोन वर्ष दगा दिला असला तरी सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. उन्हाळी पीक मळणीने हतबल झालेल्या शेतकर्यांपुढे खरिपाची चिंता लागली आहे. Crowd of farmers in agriculture center त्यामुळे खरिपात शासनाचा पीक पेरणीचा अंदाज खरा ठरणार की शेतकरी वेगळे नियोजन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकरी बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रात गर्दी करीत आहे. पण, एकंदरीत बियाण्याच्या खरेदीवरून सोयाबीनच्या पेर्यात वाढ होण्याची शयता वर्तविली जात आहे.
सेलू तालुयातील बहुतांश बागायती शेती महामार्गात गेली. आता नलगंगा नदी जोड प्रकल्प याच तालुयातून जात असल्याने बोर प्रकल्पाचे पाणी रबी पिकांसाठी मिळणार नसल्याची भीती शेतकर्यांत असल्याने शेतकरी खरीप हंगामात कोणत्या पिकाची लागवड करणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. Crowd of farmers in agriculture center सोयाबीन पीक परवडत नसले तरी या पिकानंतर गहू किंवा चणा हे पीक घेता येते. सोयाबीनचे पीक खरिपात घ्यावे लागत आहे तर कपाशी पिकाचा उत्पादन खर्च व मिळणारा भाव पाहता हे पीक परवडणारे नाही. ओलिताची शेती असल्यास केळीचे पीक फायदेशीर राहू शकते अशी प्रतिक्रिया शेतकरी सुरेश तेलरांधे यांनी दिली.
कृषी विभागाचे खरीप नियोजन
४८ हजार ५९५ हेटरमध्ये खरिपाची पेरणी होणार असून त्यात कापूस २३ हजार २२० हेटर, सोयाबीन १८ हजार ८०० हे., तूर ५ हजार ६४० हे., ज्वारी ६६० हे., मूंग ९० हे., तृणधान्य १० हे., मका २० हे., भुईमुग १० हे., तेलबिया १० हे. मध्ये पेरणी होणार असल्याचा अंदाज आहे.