नागपूर,
Ganesh Naik : मानव-वन्यजीव संघर्षांमध्ये वृद्धी झाली असून वाघ हल्ल्यात अनेकांनी आपले जीव गमाविले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासह राज्यातील सर्व जंगलाच्या शेजारी बफर झोनमधील गावांतील नागरिकांच्या संरक्षणासाठी आता कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य वन विभागातर्फे आयोजित वनक्षेत्रातील महिलांच्या ’वनशक्ती या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाला जाण्यापूर्वी नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
वन्य प्राणी असल्याची माहिती गावकर्यांना मिळेल
जंगलामध्ये वन्य प्रण्यांची संख्या वाढत असल्यामुळे मानव आणि वन्यजीवांमध्ये दिवसेंदिवस संघर्ष वाढत आहे. वन्य प्राण्यांपासून होणारा त्रास रोखण्यासाठी सर्वच जंगलाच्या जवळ असलेल्या गावांमध्ये फेन्सिंग करणे, चर खोदणे आणि वन्य प्राण्यांची माहिती गावकर्यांना होणे आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून बफर झोनमधील गावांमध्ये एआय कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या माध्यमातून गावकर्यांना वन्य प्राणी गावांत किंवा जवळच्या परिसरात असल्याची माहिती मिळेल व ते सावध होतील. निश्चित मानव-वन्यजीव संघर्ष कमी होईल. एआय कॅमेरे बसविणे हे जनहितासाठी असून यासाठी कॅम्पा वन्यजीव निधी आणि मॅनग्नोजमधील वापरण्यात येणार आहे. जंगलामध्ये वन्यजीवांची संख्या वाढत असून ती नियंत्रणात आणण्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले.
वाघ पाहण्यासाठी पर्यटक रस्त्यावर उतरतात
नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकर्याचा मृत्यू झाला होता. वाघाचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागातर्फे अनेक प्रयत्न केले. परंतु, तो नाही आणि त्याने शेतकर्याचा जीव घेतला. वन विभागातील अधिकारी व कर्मचारी आपली जबाबदारी सक्षमतेने सांभाळतात. परंतु, त्यांच्याबद्दल्ल गैरसमज पसरविण्यात येते, हे चुकीचे आहे. चंद्रपूरसह अन्य ठिकाणच्या बफर झोनमध्ये वाघ पाहण्यासाठी पर्यटक रस्त्यावर उतरतात. हे चुकीचे असून विभागासह प्रत्येक विभागात आम्ही मायक्रो लेव्हल वरती बदल करीत असून त्यातून निश्चितच चांगला होईल. विशेष म्हणजे यात जनतेचा सहभाग महत्वाचा आहे, असेही गणेश नाईक म्हणाले.