महाराष्ट्राच्या ‘समृद्धी’चे स्वप्न साकारताना

    दिनांक :07-Jun-2025
Total Views |
मुंबई वार्तापत्र,
नागेश दाचेवार
9270333886
‘‘अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का,
सबको मंजिलों का शोक है और मुझे रास्ते बनाने का...’’
 
Devendra Fadnavis : या हिंदीतील शेरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाच्या लोकार्पणप्रसंगी आपला उद्देश, हेतू स्पष्ट केला होता. खरं तर विदर्भ, मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी कनेक्टिव्हिटीची गरज असल्याने ‘‘नागपूर-मुंबई एक्सप्रेस वे’’ची कल्पना 2000 साली देवेंद्र फडणवीसांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना झालेल्या अधिवेशनात विधानसभेत मांडली होती.
 
 

CM 
 
 
 
त्यावेळी फडणवीसांनी पाहिलेलं स्वप्न हे समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न होतं. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मुंबईशी जोडणारा असा महामार्ग, जो केवळ अंतर कमी करणार नाही तर नवी स्वप्नं निर्माण करेल... असे फडणवीसांना त्यावेळी वाटले. आणि योगायोगाने महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याचं नशीब खुलायचं होतं म्हणून की काय, 2014 उजाडलं आणि महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न पाहणारे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर अनेक विकास कामांसोबतच त्यांनी आपली महत्त्वांकाक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार योजना आणि समृद्धी महामार्ग अशा दोन्ही योजनांची घोषणा केली. जलयुक्त शिवार योजना धडाक्यात चालविल्यानंतर अल्प कालावधीतच लोकप्रिय झाली आणि शेतकèयांना सिंचनाचा लाभ मिळू लागल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसू लागले. त्यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्याच्या समृद्धीचे स्वप्न असलेला समृद्धी महामार्गासाठी जागेचे अधिग्रहण सुरू झाले. तेव्हा खèया अर्थाने राज्याच्या उज्ज्वल भविष्याचा, मागास राहिलेल्या राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागांचा, समृद्ध महराष्ट्राच्या वाटचालीचा पाया रचला गेला. फडणवीसांना वाटलं महत्त्वाचं तर पाया रचणं असतं, ते कार्य मी केलंय्; आता कळस गाठायला वेळ लागणार नाही.
 
 
पण फडणवीसांना कुठे माहीत होते की, त्यांच्या स्वप्नावर विरजण घालायला त्यांच्याच सोबत बसलेले दगाबाज तयार होते म्हणून. ज्यांच्यावर या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची जबाबदारी दिली होती, तेच लोकं जमिनी देऊ नका म्हणून, विविध भागांत जाऊन शेतकèयांना पेटवत होते. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदालनं करताना दिसले. एकीकडे त्यांचा मंत्री जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया राबवत होता आणि दुसरीकडे मंत्र्याचे मालक या महामार्गाला विरोध करत जमिनी देऊ नका म्हणून लोकांना भडकवत फिरत होते. अनेक अडथळे, अनेक विघ्नं आणण्याचे पूरेपूर प्रयत्न विरोधकांकडून आणि मांडीला मांडी लावून बसलेल्या छुप्या शत्रुरूपी मित्रांकडून झाले. मुंबईच्या जिवावर राजकारण करणाèयांना उर्वरित महाराष्ट्र त्यातल्या त्यात पक्षाला थारा नसलेल्या विदर्भासारख्या भागाच्या विकासाच्या स्वप्नांची जाणीव कशी असणार? ज्यांनी 25 वर्षे एकहाती मुंबईवर राज्य केलं, ज्या मुंबईकरांनी भरभरून प्रेम दिलं, त्या मुंबईकरांच्या स्वप्नांचा चुराडा करणारे, मुंबईची दैना करणाèयांना मुंबईबाहेरील भागांच्या विकासाच्या आणि तेथील जनतेच्या प्रश्नांची जाण असण्याचं काहीही एक कारण नाही.
 
 
यांचा एकमेव उद्देश आपला धंदा चालला पाहिजे. मग आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी महाराष्ट्राची माती झाली तरी यांना चालेल. त्यासाठी मग हे लोक कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवतात. याचे उत्तम उदाहरण 2019 मध्ये बघायला मिळाले. कुठलेही वैचारिक अधिष्ठान नसताना केवळ सत्ता आणि संपत्तीच्या मोहात जुन्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. 2019 ते 2022 हा काळ महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वांत वाईट आणि दुर्दैवी काळ ठरला. या काळात महाराष्ट्रावर एका स्थगिती सम्राटाने राज्य केले. देवेंद्र फडणवीसांसोबत पूर्ण पाच वर्षे सत्ता उपभोगलेल्या या सम्राटाने आपल्याच काळात मंजूर केलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी अशा मेट्रो, जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना स्थगिती दिली तर समृद्धी महामार्गासारख्या अनेक प्रकल्पांना रखडत ठेवले. पण म्हणतात ना ‘‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंज़ूरे ख़ुदा होता है.’’ एखाद्याची स्वच्छ, प्रामाणिक इच्छा असेल आणि दृढ संकल्प असेल तर मग त्याला कोणीही थांबवू शकत नाही. असेच फडणवीसांच्या बाबतीत झाले.
 
 
ज्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात 2015 ला फडणवीसांनी आपल्या हातून केली, तो प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे लोकार्पणदेखील त्यांच्याच हस्ते झाले. यावेळी माझा महाराष्ट्र वेगाने धावणार, हे ठरवलं होतं. हा महामार्ग केवळ रस्ता नाही, ही एक समृद्धीच्या दिशेनं वाटचाल आहे. हा माझा शब्द होता, आणि तो मी पाळला, माझ्या महाराष्ट्रासाठी हे स्वप्न कधीच थांबणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही, म्हणत महाराष्ट्राच्या, विदर्भ-मराठवाड्याच्या प्रकल्पाचे पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास येताना हृदय भरून आल्याची भावना फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली. हे जरी खरे असले तरी, फडणवीसांचे एक स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि कदाचित आता ते पुन्हा पूर्ण होईल याचीही शक्यता नाही.
 
 
तेवढी एक खंत त्यांच्या मनात सदैव राहील. फडणवीसांनी या समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा 2017 मध्ये केली होती. पण दुर्दैवाने या महामार्गाला रस्त्यावर उतरून टोकाचा विरोध करणाèयांचं सरकार मधल्याकाळात आलं. आणि या संधिसाधू लोकांनी महामार्गाचं नामकरण हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे केलं. या एवढ्या निर्णयापलीकडे 33 महिने मुख्यमंत्रिपदावर राहून दुसरे कोणतेही अधोरेखित होईल असे काम यांच्या नावे नाही. असो मोठा गोल साध्य करत असताना, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, मन मारावे लागते, तेव्हाच कुठलेही मोठे लक्ष्य साधता येते.
 
 
फडणवीसांवर अनेक हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. अडचणीत आणण्याचे, खोट्या प्रकरणांमध्ये अडकविण्याचे, कुटुंबाला, त्यांच्या सहकाèयांना अडकविण्याचे असे अनेक प्रयत्न त्यावेळच्या सत्ताधाèयांनी केले. पण फडणवीसांच्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठेमुळे सत्ताधाèयांना यात यश मिळाले नाही. अनेक संकटे आणि कठीण परिस्थितींचा सामना करत कुठेही विचलित न होता, अर्जुनाप्रमाणे मासळीच्या डोळ्यावर पूर्ण लक्ष्य केंद्रित करत समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्याच्या, राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीचे लक्ष्य साधलेच. त्यासाठी त्यांचे अभिनंदन!