अनुकंपा नियुक्तीची कारवाई कालमर्यादेत करावी : पालकमंत्री

अनुकंपा भरती 150 दिवस विशेष मोहिमेत समाविष्ट

    दिनांक :23-Jul-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Sanjay Rathod राज्य शासनाने 150 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीची कालमर्यादा निश्चित करून दिली आहे. विभागांनी या मर्यादेत अनुकंपा पदे निश्चित करून वेळेत पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व विभागांना दिले आहेत.
 

Sanjay Rathod  
राज्य शासनाच्या 150 दिवस विशेष कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना कालमर्यादेत नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात जास्तीत जास्त अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहे.अनुकंपा नियुक्तीसाठी शासनाच्या निर्धारित वेळापत्रकानुसार अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा सूची अद्ययावत करणे, उमेदवारांच्या विनंतीनुसार गट बदलण्याची कार्यवाही, या नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची परिगणना, गट ‘ड’मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचे प्रस्ताव सादर करावयाचे आहे.ही सर्व प्रक्रिया येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयाची आहे. 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी याबाबत बैठक घेऊन अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदे व नियुक्तीच्या अनुषंगाने माहिती घेणार आहेत.
त्यानंतर जिल्ह्याची गट क ची सामायिक प्रतीक्षासूची अद्ययावत केली जाईल. तसेच नियुक्तीस उपलब्ध पदसंख्या प्रसिद्ध करण्यात येतील. नियुक्त प्राधिकाèयाच्या यादीप्रमाणे गट ड च्या पदावर नियुक्तीसाठी शिफारस केली जाईल. जिल्हाधिकाèयांच्या सिफारशीनुसार गट ड ची मृत करण्यात आलेली पदे नियुक्ती देण्यासाठी पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल. ही प्रक्रिया 22 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
 
 
अनुकंपा उमेदवारांचा 1 सप्टेंबर रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. त्यापूर्वी विभागाच्यावतीने गट ड ची मृत पदे पुनर्जीवित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर रोजी गट क च्या व पुनर्जीवित केल्या गट ड च्या शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकाèयांकडून अनुकंपा भरतीचा आढावा
शासनाने अनुकंपा नियुक्तीसाठी निर्धारित केलेला कालबद्ध कार्यक्रम व पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशान्वये प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सर्व नियुक्ती प्राधिकारी तथा विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी मोहन जोशी उपस्थित होते.