देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची मागणी

    दिनांक :30-Jul-2025
Total Views |
वर्धा,
Enforce population control laws सध्या बहुसंख्य हिंदू समाजाच्या सणांवर, सांस्कृतिक मूल्यांवर आणि अस्तित्वावर सतत होणार्‍या हल्ल्यांमुळे गंभीर संकटात आहे. अल्पसंख्याक नावाचा एक विशेष समुदाय, जो वेगाने १५ टयांपर्यंत वाढला आहे, तो हिंदूंवर हल्ला करतो. विशेष समुदायाची वाढती संख्या हिंदूंसाठी एक मोठा धोका आहे. देशातील वाढती लोकसंख्या आणि लोकसंख्येमुळे येणारे गंभीर धोके पाहता केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कठोर कायदे करावे अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज ३० रोजी पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
wardha
 
पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या निवेदनात नमुद केल्यानुसार, हिंदूंच्या सर्व सणांवर, देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात किंवा देशातील कोणत्या ना कोणत्या शहरात, मिरवणुकांवर हल्ले होतात. अलीकडेच बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात दंगल झाली ज्यामध्ये हिंदूंची हत्या झाली. Enforce population control laws पहलगाममध्ये एका विशिष्ट समुदायाने नियोजनबद्ध पद्धतीने दहशतवादी घटना घडवून आणली. बांगलादेशात हिंदूंवरील हत्याकांड देखील लोकसंख्येतील असंतुलनाचा परिणाम होता. बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायाची घुसखोरी हे देखील देशातील वाढत्या लोकसंख्येचे एक मोठे कारण आहे. त्यामुळे घुसखोरी थांबवणे आणि घुसखोरांना हाकलून लावणे देखील आवश्यक आहे.
 
 
 
परदेशी पैशावर लोकांचे धर्मांतर करणार्‍या सक्रिय टोळ्या देखील हिंदूंच्या सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मिळणार्‍या सर्व सरकारी सुविधांवर बंदी घालावी आणि मतदानाचा अधिकारही काढून घ्यावा. अशा कठोर शिक्षेच्या भीतीने देशातील वाढती लोकसंख्या थांबू शकते. बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना तात्काळ देशातून हाकलून लावावे. Enforce population control laws आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची ही मागणी केवळ भारतातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठीच नाही तर भारताच्या विकास आणि समृद्धीसाठी देखील आवश्यक असेही निवेदनात नमुद केले आहे. अनुप जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सतीश शर्मा, साहिल परियाल, अंकुश ठाकूर. उत्कर्ष पुसदकर, मोनू श्रीवास, स्वप्नील ठाकर, अंश श्रीवास, ओम वैद्य, कुश सोनकर, आमोद खडकडे, शिवम दुबे, खुशाल लाखे, आदी उपस्थित होते.