उत्तर प्रदेश,
Disha Patani house attack उत्तर प्रदेशातील बरेली येथे प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटणी यांच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणात पोलिस तपास सुरू असून या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर दिशा पाटणीच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत घटना कशी घडली याचा तपशील दिला आहे.
दिशा पाटणी यांच्या वडिलांनी जगदीश सिंह पाटणी यांनी पोलिसांना सांगितले की, १२ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ३.३० वाजता त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते झोपेतून जागे झाले आणि बालकनीकडे गेले. तेथे त्यांना दोन लोक बाईकवर दिसले. जेव्हा त्यांनी त्यांची ओळख विचारली, तेव्हा एका व्यक्तीने 'मार दो इसे' अशी धमकी दिली. त्याचवेळी हेल्मेट न घातलेल्या शुटरने पिस्तूल काढून त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. जगदीश पाटणी यांनी धाडसीपणे पिलर मागे लपून आपले प्राण वाचवले, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.
ही घटना ही दिशा पाटणी यांच्या घरावर झालेल्या फायरिंगच्या दुसऱ्या हल्ल्याचा भाग असून, पहिली फायरिंग ११ सप्टेंबर रोजी सकाळी ४.३३ वाजता घडली होती. मात्र ११ सप्टेंबरच्या घटनेचे पुरावे पोलिसांना अजूनही सापडलेले नाहीत.
या प्रकरणात हिंसाचार करणाऱ्या हल्लेखोरांची जबाबदारी वीरेंद्र चारण गँगने घेतल्याचा इन्शास आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत दावा केला आहे की, 'जय श्रीराम, मी वीरेंद्र चारण, महेंद्र सारण (डेलाणा), खुशबू पाटणी आणि दिशा पाटणी बहिणींच्या घरी आम्ही फायरिंग केली आहे. त्यांनी पूज्य संत प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांचा अपमान केला आहे. आमच्या सनातन धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही. हा फक्त एक इशारा आहे; पुढच्या वेळी असे काही केल्यास घरातील कोणीही जिवंत राहणार नाही,' असे या धमकीमध्ये म्हटले आहे.
कोणीही जिवंत राहणार नाही
दिशा पाटणी यांच्या वडिलांनी मुलींची बाजू घेत तर्क केला की, सर्वांना आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. तसेच अनिरुद्धाचार्य यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ देत, ज्यामध्ये मुली २४-२५ वर्षांच्या वयात तोंड मारतात असे सांगितले होते, ते त्यांच्या वैयक्तिक विचारांवर आधारित होते. दिशा पाटणी आर्मीमध्ये असून तिने स्पष्ट केले की, कोणीही महिलांचा अपमान सहन करणार नाही. तिच्या बहिणीने खुशबू पाटणीनेही या वक्तव्यांवर टीका केली आहे. तिच्या मते, या वक्तव्यांना तोडमोड करून सादर केले गेले आणि प्रेमानंद महाराज यांच्या वक्तव्याशी जोडले गेले.या घटनेने बरेलीत समाजात खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणात गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.