कौतुकास्पद! बांबू उद्योगासाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरणार

मुंबईत १८-१९ सप्टेंबरला दोन दिवसीय "बांबू समिट"

    दिनांक :17-Sep-2025
Total Views |
मुंबई,
bamboo summit राज्यात बांसाच्या वापरावर आधारित उद्योगांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि फिनिक्स फाउंडेशन (लोधगा, लातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत दोन दिवसीय 'बांबू समिट'चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिखर संमेलन १८ आणि १९ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे पार पडणार आहे. यामध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) केले जाणार असून, देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ आणि शेतकरी सहभागी होणार आहेत.
 
 

bamboo summit  
महाराष्ट्र सरकारचा bamboo summit थिंक टँक ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA) आणि फिनिक्स फाउंडेशनने याचे आयोजन केले असून, महाराष्ट्र अशा प्रकारचा समिट आयोजित करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कार्यक्रमात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि उद्योजक सहभागी होणार आहेत.
 
 
सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
या दोन bamboo summit दिवसीय शिखर संमेलनात बांसाशी संबंधित विविध उद्योगांवर सखोल चर्चा होणार आहे. यात इथेनॉल, मेथनॉल, पेलट्स, चारकोल, लाकूड, फर्निचर आणि वस्त्रनिर्मिती यांचा समावेश आहे. बांसाला पर्यावरणपूरक आणि टिकाऊ विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे बायोफ्युएल उत्पादन, वनोंत्पादन, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बांसाचा वापर कसा करता येईल, यावर भर दिला जाणार आहे.राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बांस म्हणजेच 'कल्पवृक्ष' आहे. तो केवळ कार्बन शोषणात प्रभावी नाही, तर जंगलतोडीला पर्याय निर्माण करून हरित ऊर्जा उत्पादनातही मोलाची भूमिका बजावू शकतो. “आपली पृथ्वी आधीच अनेक पर्यावरणीय संकटांना सामोरी जात आहे. अशा वेळी बांस हे टिकाऊ आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुढे येत आहे,” असे पटेल म्हणाले.या समिटच्या पहिल्या दिवशी शहरी वनीकरण, ऑक्सिजन पार्क्स आणि हरित इमारतींसारख्या विषयांवर तज्ज्ञांद्वारे सादरीकरणे आणि चर्चा होणार आहेत. दुसऱ्या दिवशी विविध उद्योगपती आणि राज्य शासनाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत गुंतवणूकविषयक बैठका आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होतील.
 
 
राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नव्या आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच बांबूच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी या समिटचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून महाराष्ट्र देशातील एक हरित आणि औद्योगिकदृष्ट्या सक्षम राज्य म्हणून उभे राहण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.