बुलढाणा,
buldhana-farmers-rain राज्यात अतिवृष्टीमुळे ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे केंद्रीय प्रतापराव जाधव यांनी सांगितले
बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबुन शेत मालाचे नुकसान झाले. अनेकांच्या शेत जमिनी खरडून गेल्यात. यामध्ये अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले. दि.२९ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकर्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीला शेतकर्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे.

buldhana-farmers-rain झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचार्यांना निर्देशित केले आहे. परंतु शेतकर्यांनी गावाचे तलाठी कृषी सहाय्यक यांच्या सोबत समन्वय साधून यांनी योग्य पद्धतीने नुकसानीची पंचनामे करून घ्यावेत. झालेल्या पंचनाम्याचे चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकर्यांसोबत संवाद साधताना केले.
दि. २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा तालुाक्यातील गिरडा मोताळा तालुक्यातील नळकुंड उबाळखेड येथे ’झालेल्या नुकसानीची पाहणी बांधावर जाऊन केली. त्यावेळी त्यांच्यासोबत आ. संजय गायकवाड जिल्हाप्रमुख ओमसिग राजपूत, तालुका प्रमुख धनंजय बारोटे, मोताळा प्रमुख रामदास चौथंकर, महिला आघाडीच्या अनुजा ताई सावळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.