मोरीगाव,
Earthquake in Assam आज पहाटे आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात जोरदार भूकंपाचे धक्के बसले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल होती. भूकंपाचा धक्का पहाटे ४:१७ वाजता बसला, जेव्हा बहुतेक लोक झोपेत होते. आसाम व्यतिरिक्त, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील इतर भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे अनेक रहिवासी घाबरून घराबाहेर पडले.
भूकंपाचे केंद्र सुमारे ५० किलोमीटर जमिनीखाली असल्यामुळे त्याचे धक्के दूरवरही जाणवले. काही भागात सौम्य तर काही भागात तीव्र भूकंपाचे अनुभव आले. तरीही, अद्याप कोणत्याही जखमी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संवेदनशील भागांमधून सतत माहिती गोळा केली जात आहे. प्रशानाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. भूकंपप्रवण भागात राहणाऱ्यांनी नेहमीच सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.