लाडकी बहीण योजनेत गोंधळ; पात्र महिलांचे अनुदान अचानक का थांबले? घ्या जाणून

09 Jan 2026 15:17:40
मुंबई,   
ladki-bahin-yojana सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना गरीब कुटुंबातील महिलांसाठी मोठी आर्थिक मदत ठरली आहे. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्या महिलांना या योजनेत दर महिन्याला १,५०० रुपये अनुदान दिले जाते. ही योजना महिला वर्गामध्ये लोकप्रिय ठरली असून विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीस मोठा फायदा झाला होता. मात्र, आता या योजनेसंबंधी धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे.
 
ladki-bahin-yojana
 
सरकारने योजनेसाठी काही अटी घातल्या होत्या, पण काही महिलांनी पात्र नसतानाही लाभ घेतला असल्याचे लक्षात आले. यावर उपाय म्हणून पात्र आणि अपात्र लाभार्थींमध्ये फरक करण्यासाठी केवायसी बंधन घालण्यात आले होते, ज्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक पात्र महिलांनी वेळेवर केवायसी केली तरीही त्यांचे नाव चुकीने “शासकीय कर्मचारी” म्हणून नोंदवल्यामुळे अनुदान थांबवण्यात आले आहे. ladki-bahin-yojana तसेच, केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्यामुळे काही महिला देखील योजनेतून वगळल्या गेल्या आहेत. याशिवाय, ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा ज्यांच्याकडे वाहन आहे, त्यांची नावे देखील अनुदान योजनेतून वगळण्यात आली आहेत. परिणामी, काही पात्र महिलांना अनुदान न मिळाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत आणि योजनेचा मूळ उद्देश प्रभावित झाला आहे.
Powered By Sangraha 9.0