३०,००० लोकांच्या गर्दीत हरवलं मुलं मग सोनू निगमचा करणामा

    दिनांक :11-Feb-2026
Total Views |
कर्नाटक,
Sonu Nigam Hubli concert बॉलीवूडचे लोकप्रिय गायक सोनू निगम सध्या त्यांच्या ‘दीवाना तेरा’ या संगीत दौऱ्यामुळे देशभर चर्चेत आहेत. मात्र हुबळी येथे झालेल्या त्यांच्या अलीकडील कार्यक्रमात घडलेल्या एका हृदयस्पर्शी प्रसंगामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. सुमारे ३० हजार प्रेक्षकांच्या गर्दीत हरवलेल्या एका लहान मुलाला सोनू निगम यांनी स्टेजवर बोलावून घेत, गाण्याच्या माध्यमातून त्याला शांत केले आणि अखेरीस त्याच्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडवून आणली.
 

Sonu Nigam Hubli concert  
सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमातील व्हिडिओ सोनू निगम यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्री साई नावाचा एक चिमुकला मुलगा स्टेजवर दिसतो. गर्दीत कुटुंबापासून वेगळा झाल्याने तो घाबरलेला होता. परिस्थिती ओळखत सोनू यांनी त्याला जवळ घेतले आणि वातावरण हलकेफुलके करण्यासाठी तत्काळ एक गाणे तयार केले.
 
 
“श्री साई या, मम्मी-पापा त्याला घेऊन जा… त्याचे मम्मी-पापा हरवले आहेत, लवकर येऊन त्याला घेऊन जा,” असे गात त्यांनी प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला. मुलाचे लक्ष विचलित व्हावे आणि त्याची भीती कमी व्हावी यासाठी त्यांनी त्याच्याशी गप्पाही मारल्या. “बाबा, मम्मी तुमच्याशिवाय मजा करत आहे, माहिती आहे का?” असे विचारल्यावर मुलाने निरागसपणे “बाबा इथे नाहीत” असे उत्तर दिले. त्यानंतर “मग कोण आले आहे?” असे विचारल्यावर मुलाने “चाचू” असे सांगितले. त्यावर सोनू यांनी विनोदी शैलीत “अरे चाचा, तू त्याला सोडून कुठे गेलास?” अशी मिश्कील टिप्पणी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.कार्यक्रमाच्या प्रॉडक्शन टीमने शोध घेतल्यानंतर मुलाचा काका सापडला. सोनू निगम यांनी स्वतः त्या मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे सोपवले. हा संपूर्ण प्रसंग उपस्थितांसाठी भावनिक ठरला.
 
 
व्हिडिओ सोशल मीडियावरSonu Nigam Hubli concert व्हायरल झाला असून चाहत्यांनी सोनू निगम यांच्या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे कौतुक केले आहे. “या क्षणासाठी तो हरवलाच पाहिजे होता,” अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली, तर दुसऱ्याने विनोदी स्वरात “हा व्हिडिओ श्री साईंच्या वडिलांपर्यंत पोहोचू नये,” असे लिहिले.गायक म्हणूनच नव्हे तर माणुसकी जपणारा कलाकार म्हणूनही सोनू निगम पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात घर करून गेले आहेत. ‘दीवाना तेरा’ दौऱ्यादरम्यानचा हा प्रसंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक भावनिक पैलू समोर आणणारा ठरला आहे.