कोल्हापूर अंबाबाई मंदिरात किरणोत्सव...पण चांदीच्या उंबऱ्यापर्यंत!

    दिनांक :02-Feb-2026
Total Views |
कोल्हापूर,
Kironotsav at Ambabai Temple करवीर येथील श्री अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मावळतीच्या किरणांनी चांदीच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचले. साधारणपणे वातावरण स्वच्छ असल्यास किरणे देवीच्या मुखापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा होती, मात्र आज ढगाळ वातावरणामुळे किरणांची तीव्रता कमी राहिली. परिणामी, प्रकाश मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचला आणि तिथेच विरला. भाविकांचे लक्ष या अद्भुत दृश्यावर ठेवलं होतं. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात प्रवेश केलेल्या किरणांनी वातावरणात खास उत्साह निर्माण केला, मात्र आकाशातील ढगांमुळे किरणांचा प्रवास पूर्ण झालेला दिसला नाही. या वेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आणि प्रा. मिलिंद कारंजकर उपस्थित होते.
 

Kirnotsav at Ambabai Temple 
 
भाविकांची उपस्थिती दरवर्षीप्रमाणे मोठी होती. देवस्थान समिती आणि खगोलशास्त्र संशोधकांच्या मते, जर हवामान स्वच्छ असते, तर किरणे मूर्तीच्या चरणांपासून मुखापर्यंत पोहोचू शकली असती. मात्र निसर्गाच्या खेळामुळे पूर्ण अनुभव घेण्यासाठी भाविकांना तिसऱ्या दिवशीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सोमवारी, २ फेब्रुवारीला, किरणोत्सवाचा अंतिम दिवस साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवशी सुटीचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक आणि पर्यटक मंदिर परिसरात जमा झाले. सकाळी महाकुंकुमार्चन सोहळा पार पडल्यामुळे महिलांची उपस्थिती जास्त होती, तर सायंकाळपर्यंत किरणोत्सवाचा आनंद घेण्यासाठी गर्दी कायम राहिली. रात्री पार पडलेल्या पालखी सोहळ्यालाही हजारो भाविकांनी उत्साहाने हजेरी लावली.