झिम्बाब्वेचा दणदणीत पराभव; वेस्ट इंडिजच्या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सोपा

24 Feb 2026 11:31:54
नवी दिल्ली,  
zimbabwe-defeat-west-indies आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर ८ फेरीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला असला, तरी उपांत्य फेरीची आशा अद्याप जिवंत आहे. या पराभवानंतर भारताचा नेट रन रेट मोठ्या प्रमाणात घसरला; मात्र गटातील इतर सामन्यांमुळे समीकरण पुन्हा रंगतदार बनले आहे.
 
zimbabwe-defeat-west-indies
 
वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेवर १०७ धावांची दणदणीत मात करत उपांत्य फेरीच्या शर्यतीत मोठी उलथापालथ घडवून आणली. या निकालामुळे वेस्ट इंडिजचा नेट रन रेट तब्बल ५.३५० वर पोहोचला, तर झिम्बाब्वेचा दर -५.३५० पर्यंत घसरला. परिणामी, झिम्बाब्वेची पुढील फेरी गाठण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. मोठ्या फरकाच्या या पराभवाने त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सध्या गटातील खरी स्पर्धा भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातच मर्यादित राहिली आहे. भारताचा नेट रन रेट -३.८०० इतका घसरलेला असला, तरी पुढील दोन सामने निर्णायक ठरणार आहेत. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे हे सामने भारतासाठी करो किंवा मरो अशा स्वरूपाचे आहेत. zimbabwe-defeat-west-indies दोन्ही सामने जिंकण्यात भारत यशस्वी ठरला, तर त्याच्या खात्यात चार गुण जमा होतील आणि उपांत्य फेरीचे दार उघडे राहील.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला सामना जिंकलेला आहे. zimbabwe-defeat-west-indies त्यांनी जर वेस्ट इंडिजलाही पराभूत केले, तर भारतासाठी परिस्थिती अधिक अनुकूल ठरेल. अशा वेळी दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी राहील आणि भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. मात्र वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला, तर गुणतालिकेत तिघांमध्ये चुरस वाढेल आणि नेट रन रेट निर्णायक ठरेल. एकूण चित्र पाहता भारताचा मार्ग सोपा नसला, तरी अशक्यही नाही. पुढील दोन सामन्यांतील कामगिरी आणि प्रतिस्पर्धी संघांचे निकाल यावरच उपांत्य फेरीचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे सुपर ८ गटातील उर्वरित सामने अत्यंत रोमांचक आणि तणावपूर्ण ठरण्याची चिन्हे आहेत.
Powered By Sangraha 9.0