नवी दिल्ली,
coaches-gambhir-and-surya २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघासाठी आजचा सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम येथे टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार असून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या ७६ धावांच्या पराभवानंतर भारताचा नेट रन रेट घसरला आहे आणि तो सुधारण्यासाठी दमदार कामगिरीची गरज आहे.

आजचा सामना चेपॉकच्या काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळला जाणार आहे. ही पिच गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत स्पर्धांपासून दूर ठेवून विश्वचषकासाठी खास तयार करण्यात आली आहे. coaches-gambhir-and-surya अलीकडेच याच मैदानावर न्यूझीलंडने १८३ धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले होते, त्यामुळे येथे मोठ्या धावा होऊ शकतात, असे संकेत मिळाले आहेत. नव्याने विकसित केलेले जलद आउटफील्डही फलंदाजांसाठी अनुकूल ठरू शकते. चेन्नईतील संध्याकाळच्या सामन्यांमध्ये दव हा नेहमीच महत्त्वाचा घटक असतो. दुसऱ्या डावात चेंडू ओला झाल्यास फिरकीपटूंना नियंत्रण राखणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव संघरचनेत बदल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. उजव्या-डाव्या फलंदाजांची जोडी उघडण्यासाठी उतरवण्याचा विचार सुरू आहे. संजू सॅमसनला अभिषेक शर्मासोबत सलामीसाठी पाठवले जाऊ शकते, ज्यामुळे मधल्या फळीला स्थैर्य आणि फिरकीविरुद्ध अतिरिक्त पर्याय मिळू शकतो. रिंकू सिंग संघात सामील झाला असला तरी तो अंतिम अकरात असेल का, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. फिरकी आणि फलंदाजी दोन्ही विभागात संतुलन साधण्यासाठी अक्षर पटेलचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. भारतासाठी हा सामना करो किंवा मरो असा आहे. coaches-gambhir-and-surya आज विजय मिळवण्यात अपयश आले, तर विश्वचषकातील त्यांचा प्रवास येथेच थांबू शकतो. त्यामुळे चेपॉकच्या मैदानावर भारतीय संघ सर्व शक्तीनिशी उतरणार आहे.