मोठा दावा! जयंत पाटील भाजपा सोबत? 'राजकारणात खळबळ'

05 Feb 2026 15:09:19
सांगली,
Sadbhaau Khot महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे वातावरण तापलेले आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर आणि राजकीय गदारोळ वाढलेला दिसत आहे. अशा परिस्थितीतच सांगली जिल्ह्यात दोन राजकीय नेत्यांमध्ये गडबडलेले वातावरण निर्माण झाले आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
 

Sadbhaau Khot 
काही दिवसांपूर्वी सांगलीतील वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्याबाबत अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी म्हटले, “आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्या दिवसात ते भाजपात येतील. भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही, ते बघावे. सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही. कधी उडी मारायचे ते बघायला लागले आहे.”
 
 
सदाभाऊ खोतांनी अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवर देखील निशाणा साधला. “पडक्या घरात मुक्कामाला कोणी जातंय का? अजित दादा केवढा मोठा माणूस, तो गेल्यावर महाराष्ट्र हळहळला,” असे ते म्हणाले. खोतांच्या भाषेत, “तर एक रिक्षावाला माणूस उपमुख्यमंत्री झाला आणि एक माणूस आग लावत सुटलाय. राष्ट्रवादी एक करायला दादा तुमच्याकडे हेलपाटे मारायला, तुमच्याकडे काय पाच-पन्नास आमदार आहेत का?” अशी खोचक टीका त्यांनी केली.
 
 

टीकेची झोड
या विधानावर जयंत पाटील Sadbhaau Khot यांनीही चोख प्रत्युत्तर दिले. वाळवा येथे पार पडलेल्या दुसऱ्या सभेत त्यांनी म्हटले, “दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे, आणि तोच मला म्हणतोय की मी भाजपात जाणार.” पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्या टीकेवरून आपले मत स्पष्ट केले आणि स्वतःवर होणाऱ्या अटकळीत विरोध केला.राजकीय वर्तुळात आता चर्चांचे प्रमाण वाढले असून, भाजपात जयंत पाटील प्रवेश करतील का यावर कटाक्ष ठेवण्यात येत आहे. तसे झाल्यास शरद पवारांच्या गटाला निश्चितच मोठा धक्का लागू शकतो. सध्या महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये पक्षांतर आणि आंतरिक वाद यांचा रंग वाढताना दिसत आहे, आणि सांगलीतील ही घटना त्या गदारोळाची झलक मानली जात आहे.
Powered By Sangraha 9.0