भोर
attacked by dog केंजळ गावात शेतात काम करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या पाच वर्षीय मुलावर कुत्र्याने हल्ला केला, आणि या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता घडलेल्या या घटनाने परिसरात शोककळा पसरली आहे. वनविभागाने तपासानंतर स्पष्ट केले की, हल्ला करणारे प्राणी कोणतेही वन्यप्राणी नसून, एक कुत्रा होता.
चाळीसगाव येथील कृष्णा किरण सोनवणे (वय ५) हे कुटुंबीयांसह केंजळ येथील ऊस फडात कामासाठी आले होते. सकाळी कृष्णाला शौचास लागल्याने त्याच्या आईने त्याला शेताच्या कडेला पाठवले. काही वेळाने, कृष्णा परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर त्याला रक्तबंबाळ अवस्थेत शेतात सापडले. तातडीने त्याला भोर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी, सुरुवातीला वनविभागाने वन्यप्राण्याच्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती, परंतु तपासानंतर ते पूर्णपणे नाकारण्यात आले. वनविभागाने सांगितले की, कृष्णाच्या जखमा वन्यप्राण्यांमुळे नाहीत, तर कुत्र्याच्या हल्ल्यामुळे झाल्या आहेत. घटनास्थळी कुत्र्याचे पायाचे ठसे आढळले, तसेच उपस्थित ऊसतोड कामगारांनीदेखील कुत्र्याच्या हल्ल्याची पुष्टी केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले की, "आम्ही घटनास्थळाची पाहणी केली. कुत्र्याचे पायाचे ठसे सापडले आहेत. स्थानिक कामगारांनीदेखील कुत्र्याचाच हल्ला केल्याचे सांगितले. बिबट्या किंवा अन्य कोणत्याही वन्यप्राण्याचा हल्ला झालेला नाही."यामुळे परिसरातील शेतकरी आणि मजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. ऊस फडांभोवती अनेक कुत्र्यांचा वावर असल्याने, मजुरांच्या मुलांसाठी हा धोका होऊ शकतो, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.घटनेनंतर राजगड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. मृत मुलाच्या पालकांचा जबाब घेतला असून, वनविभाग आणि पोलिस अधिक तपास करत आहेत.त्यानंतर प्रशासनानेही या घटनेवर लक्ष देऊन, भविष्यकालीन उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेतली आहे. कुत्र्यांचे नियंत्रण ठेवणे आणि शेतकऱ्यांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित काही पावले उचलली जावी, अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.