१७ जणांचा मृत्यू ... सखोल चौकशीचे आदेश

01 Mar 2026 13:32:12
नागपूर
Nagpur Raulgav explosive factory blast, राऊळगाव (बाजारगावजवळ) येथील एका एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीमध्ये शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
 

Nagpur Raulgav explosive factory blast, 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दुःख व्यक्त करत या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.
 
 
जिल्हाधिकारी आणि पोलीस Nagpur Raulgav explosive factory blast, अधीक्षक घटनास्थळी तळ ठोकून आहेत, तर NDRF आणि SDRF ची पथके मदतीसाठी दाखल झाली आहेत. याशिवाय, 'पेसो' आणि 'डिश' या तांत्रिक तपासणी करणाऱ्या विभागांच्या पथकांनी स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू केले आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राऊळगाव येथील स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत." त्यांनी प्रशासनाला सांगितले की, या दुर्घटनेमागील कारणे आणि कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याची सखोल चौकशी करावी.या दुर्घटनेमुळे परिसरात शोक आणि दहशत पसरली असून, प्रशासन घटनास्थळी सुरक्षा आणि बचाव कार्यात पूर्णपणे सक्रिय आहे.
 
 
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा 
 
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूर येथील स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनएरएफ) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले. रविवारी सकाळी नागपूरच्या रौलगाव येथील खाण आणि औद्योगिक स्फोटके उत्पादक एसबीएल एनर्जी लिमिटेड कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 17 जणांचा मृत्यू झाला आणि 18 जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली"महाराष्ट्रातील नागपूर येथील कारखान्यात झालेला स्फोट अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे,” असे मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे."" प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये रु. ची सानुग्रह अनुदान दिले जातील. तर जखमींना 50000 रुपयांची मदत दिली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

 
 
 
 
Powered By Sangraha 9.0