तंटामुत समितीचा अध्यक्षच गावातून गायब

14 Mar 2026 20:34:28
अल्लीपूर
Allipur महाराष्ट्र शासन निर्णयानुसार तंटामुत गाव अंतर्गत प्रत्येक गावात तंटामुत समिती स्थापन करून गावातील भांडण, तंटे गावातच मिटल्यास वेळ व पैसा वाचेल यासाठी दोन वर्षांआधी नव्याने पूर्ण समितीचे ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभा घेऊन तंटामुत अध्यक्ष व समितीचे सदस्य गठीत करण्यात आले होते. आता मात्र, गावाचा तंटामुती अध्यक्षच गायब झाल्याने गावकर्‍यांनी समस्या सोडविण्यासाठी जावे कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
tantamukti samiti 
Allipur घरगुती वाद, पती-पत्नी वाद, धुर्‍याचा वाद, नालीचा वाद अशा किरकोळ वादावर पोलिस स्टेशनला गेल्यावर ते दखल घेत नाहीत. असे वाद सोडविण्यासाठी तंटामुत समितीकडे दाद मागण्याचा सल्ला दिला जातो. आपसी व नातेवाईकांचा वाद असल्यास तो तंटामुतीकडे सोपविण्यात येतो. पण, आता तंटामुती अध्यक्षच गावातून दिसेनासा झाल्याने गावातील तंटे व वाद कोण सोडविणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासक यांनी दखल घेऊन येणार्‍या ग्रामसभेत ठराव घेऊन नवीन तंटामुक्त अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी गावकर्‍यांकडून केली जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0