नवी दिल्ली,
fficers given early retirement भारतीय रेल्वे आपल्या यंत्रणेत शिस्त आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देत मोठा निर्णय घेतला आहे. कामगिरीत सातत्याने कमी पडणाऱ्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियोजित कालावधीपूर्वीच सेवामुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे रेल्वे विभागात मोठी खळबळ उडाली असून, कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की निष्काळजीपणा आणि अकार्यक्षमता सहन केली जाणार नाही.ही कारवाई रेल्वे स्थापत्य नियमांतील तरतुदीनुसार करण्यात आली आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, एखाद्या अधिकाऱ्याची कामगिरी समाधानकारक नसल्यास त्याला वेळेपूर्वी सेवानिवृत्त करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. याच अधिकाराचा वापर करत संबंधित अधिकाऱ्यांवर ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

सेवामुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये विविध विभागांतील वरिष्ठ पदांवर कार्यरत अधिकारी समाविष्ट आहेत. उत्तर, दक्षिण-पश्चिम, दक्षिण-पूर्व मध्य आणि पूर्व रेल्वे क्षेत्रातील काही अधिकारी तसेच रेल्वे मंडळाशी संबंधित काही अधिकारी यामध्ये आहेत.रेल्वे मंत्रालयाने या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यासाठी जबाबदार असलेल्या या मोठ्या व्यवस्थेत शिथिलतेला स्थान राहणार नाही. कार्यक्षमतेत सातत्य राखणे आणि जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा कठोर कारवाई होणार, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.या पावलातून सरकारी नोकरी ही केवळ सुरक्षिततेची हमी नसून जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे आवश्यक आहे, हे अधोरेखित करण्यात आले आहे. भविष्यातही कामगिरीत कमी पडणाऱ्यांविरोधात अशीच कठोर भूमिका घेतली जाईल, असे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.