मुंबई
Dhurandhar 2 बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवत सर्व विक्रम मोडले आहेत. अल्पावधीतच ३०० कोटींचा टप्पा पार करत या चित्रपटाने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘धुरंधर २’ची वाढती लोकप्रियता पाहता चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांकडूनही त्याचे कौतुक होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर २’चे विशेष कौतुक केले आहे. सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना राजामौली यांनी नमूद केले की, ‘धुरंधर १’ आवडला होता, मात्र ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ने त्या चित्रपटालाही मागे टाकत अधिक उंची गाठली आहे. लेखन, कलाकारांची निवड, तांत्रिक बाबी, संगीत आणि दिग्दर्शन या सर्व घटकांचा उत्कृष्ट संगम या चित्रपटात दिसून येतो, असे त्यांनी सांगितले.
राजामौली पुढे म्हणाले की, या चित्रपटाची खरी ताकद त्याच्या भावनिक मांडणीत आहे. कथानकातील वळणे तणावपूर्ण असून प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. चार तासांचा चित्रपट सादर करण्याचे धाडसही त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. प्रेक्षकांनी अखेरच्या दृश्यापर्यंत रस कायम ठेवला, हेच या चित्रपटाच्या यशाचे मोठे कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 अभिनयाविषयी बोलताना राजामौली यांनी विशेष प्रशंसा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, चित्रपटातील भावनिक प्रसंगांमध्ये रणवीरने साकारलेली भूमिका अत्यंत प्रभावी आहे. सुरुवातीपासून ते क्लायमॅक्सपर्यंत त्याने साकारलेले विविध पैलू प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. तसेच सहकलाकार आर. माधवन यांच्या अभिनयालाही त्यांनी दाद दिली.दरम्यान, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार विजय देवरकोंडा, महेश बाबू, अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर यांनीही ‘धुरंधर २’चे कौतुक करत चित्रपटाच्या यशात भर घातली आहे.सध्या ‘धुरंधर २’ सिनेमागृहांमध्ये जोरदार कमाई करत असून, लवकरच ३०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आणि दिग्गजांकडून मिळणारे कौतुक यामुळे हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या हिटपैकी एक ठरण्याची चिन्हे आहेत.