मुंबई,
Shiv Thakare मनोरंजनाच्या क्षेत्रात एक नवीन अध्याय उलगडला आहे. ‘द ५०’ या रियलिटी शोला अखेर आपला पहिला विजेता मिळाला आहे. अनेक आठवड्यांच्या तीव्र स्पर्धेनंतर, २२ मार्च रोजी शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोमध्ये भारतातील टीव्ही, सोशल मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील ५० दिग्गजांना एकत्र करून, त्यापैकी फक्त काही मोजकेच स्पर्धक महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचले होते.
या शोमध्ये आपली छाप सोडणाऱ्या आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या शिव ठाकरेने त्यांचा विजय सिद्ध केला. मिस्टर फैजू, रजत दलाल, काका आणि कृष्णा श्रॉफ यांसारख्या प्रबळ स्पर्धकांना मागे टाकत शिव ठाकरे यांनी 'द ५०' या शोचा विजेता होण्याचा मान मिळवला. ट्रॉफी जिंकतानाच, शिव ठाकरे यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले
शिव ठाकरे यांनी विजयाबद्दल Shiv Thakare आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “‘द ५०’ हा शो माझ्यासाठी एक अत्यंत वेगळा आणि नवीन अनुभव होता. मला जगाला शिव ठाकरे यांची एक वेगळी बाजू दाखवायची होती, जी गोंधळ किंवा भांडणावर आधारित नाही. मी विश्वास ठेवतो की, तुम्ही शांति आणि साधेपणाने खेळ जिंकू शकता. ५० दिग्गज खेळाडूंमध्ये हा पहिला सीझन जिंकणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव राहील. हे समजून मी आनंदी आहे की, मी एक चांगला खेळाडू म्हणून हा टायटल जिंकला.”