धुळे
Sakri Taluka देशातल्या वाढत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा, मोहोगाव आणि चावडीपाडा या तीन गावांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या गावांनी पुढील सहा महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर पूर्णपणे थांबवण्याचा निर्धार केला असून, या काळात स्वयंपाकासाठी जंगलातील वाळलेले लाकूड आणि शेना पासून बनवलेल्या गोवऱ्यांचा वापर करण्याचे ठरवले आहे.
या निर्णयामागे गावकऱ्यांची मुख्य प्रेरणा जागतिक स्तरावर इंधन पुरवठा संकट आणि LPG गॅसच्या तुटवड्याशी सामना करण्याची होती. गावकऱ्यांच्या बैठकीचे मार्गदर्शन पद्मश्री चेतराम पवार यांनी केले आणि सर्वांसमोर देशहित आणि पर्यावरण संवर्धन या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला.
बारीपाडा, मोहोगाव आणि Sakri Taluka चावडीपाडा या तीन गावांत सुमारे ४,००० लोकसंख्या आहे, आणि ४०० घरांमध्ये गॅस शेगड्या असूनही लोकांनी स्वेच्छेने गॅसचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, जर येणाऱ्या सहा महिन्यांमध्येही इंधनाची टंचाई भासली तर हा निर्णय कायम ठेवला जाईल.गॅसच्या ऐवजी लाकूड, गोवऱ्या आणि पारंपरिक चुलींचा वापर केला जाणार आहे, मात्र आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी धूरमुक्त चुली आणि पर्यावरणपूरक इंधन वापर यावर विशेष भर दिला जाणार आहे. गावकऱ्यांनी देशहित सर्वोच्च या भावनेला प्राधान्य देत हा धाडसी निर्णय सर्वानुमते घेतला आहे.विशेषतः जागतिक इंधन संकटाचा सामना करण्यासाठी घेतलेले हे पाऊल केवळ या तालुक्यापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या तीन गावांच्या या निर्णयाचे राज्यभरातून कौतुक होत असून, हा उपक्रम इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक आदर्श म्हणून पाहिला जात आहे.गावकऱ्यांनी दाखवलेल्या या सामाजिक जबाबदारीने आणि एकात्मतेने देशातल्या इंधन वापराच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणण्याची दिशा दिली आहे.