नवी दिल्ली
Supreme Court सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने ५ जनहित याचिका (झखङ) दाखल केल्या होत्या. यापैकी एका याचिकेत, कांदा आणि लसूणमध्ये तामसिक किंवा नकारात्मक ऊर्जा असते की नाही, यासाठी संशोधनाची मागणी करण्यात आली होती. यावर सोमवारी सुनावणी करताना भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ॲडव्होकेट सचिन गुप्ता यांना फटकारले. उगख नी विचारले - मध्यरात्री या सर्व याचिका तयार करता का?
सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या पीठाने वकिलाच्या पाचही जनहित याचिका अस्पष्ट, निरर्थक आणि निराधार ठरवून फेटाळून लावल्या. याचिकाकर्त्याने उत्तर दिले की हा एक सामान्य मुद्दा आहे आणि दावा केला की गुजरातमध्ये जेवणात कांद्याच्या वापरावरून कथितपणे घटस्फोट झाला होता. कांदा आणि लसूण संबंधित याचिकेत जैन समाजाच्या खाण्यापिण्याच्या पद्धतींचा उल्लेख होता, जे पारंपारिकपणे कांदा, लसूण आणि कंदमुळे असलेल्या भाज्यांना तामसिक अन्न मानून त्यांचा त्याग करतात.
Supreme Courtन्यायालयाने गुप्ता यांना विचारले, ‘तुम्हाला जैन समाजाच्या भावना का दुखावण्याची इच्छा आहे?‘ तुम्ही वकील नसता तर दंड लावला असता. बेंचने याचिका फेटाळताना सांगितले की, जर याचिकाकर्ता वकील नसता तर आम्ही खूप मोठा दंड लावून ती फेटाळली असती. बेंचने पुढे म्हटले की, ही याचिका निष्काळजीपणे मसुदा तयार करणे आणि सर्वोच्च न्यायालयावर भार टाकण्याचे एक उदाहरण आहे. गुप्ता यांना इशारा देण्यात आला की, पुढच्या वेळी तुम्ही अशी याचिका दाखल कराल, तेव्हा खूप मोठा दंड आकारला जाईल.