मुंबई
Maharashtra government employees strike राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर कर्मचारी संघटनांनी हा निर्णय घेतला असून येत्या सोमवार पासून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Maharashtra government employees strike सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप मागील चार दिवसांपासून सुरू होता. या आंदोलनामुळे राज्यातील अनेक शासकीय सेवांवर परिणाम झाला होता. मात्र सरकारकडून झालेल्या चर्चेनंतर काही मागण्यांबाबत लेखी आश्वासने देण्यात आल्याने संघटनांनी संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी, रिक्त पदांची भरती, वेतन सुधारणा आणि सेवाशर्ती सुधारणा यांचा समावेश होता. सरकारने काही मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने चर्चेचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे शाळा, आरोग्य सेवा आणि इतर शासकीय विभागांतील रखडलेले कामकाज पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे. संप काळात काही सेवांवर मोठा परिणाम झाला होता, विशेषतः आरोग्य आणि प्रशासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण झाले होते.दरम्यान, संघटनांनी स्पष्ट केले आहे की, उर्वरित मागण्यांवर शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास भविष्यात पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो.या घडामोडीनंतर राज्यातील प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास टाकला असून, आता सर्वांचे लक्ष सरकार पुढील कार्यवाही कशी करते याकडे लागले आहे.