मुंबई
Sanjay Nirupam राज्यात १ मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील काही अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या सक्तीमुळे गरीब आणि रोजंदारीवर अवलंबून असलेल्या चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. “कोणाचाही रोजीरोटीचा धंदा हिसकावून घेऊ नये,” असे मत त्यांनी व्यक्त केले.निरुपम यांनी पुढे सांगितले की, संबंधित मंत्र्यांशी या विषयावर चर्चा झाली असून पुढील आठवड्यात यावर बैठक होणार आहे. तसेच आपण चालकांच्या बाजूने भूमिका मांडली असून शासनाने यावर पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या दरम्यान, या मुद्द्यावरून Sanjay Nirupam निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “यावरून वाद निर्माण होऊ नये,” असे सांगत त्यांनी परिस्थिती शांत ठेवण्याचे आवाहन केले आहे.मात्र, निरुपम यांनी आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडताना आंदोलनावेळी झालेल्या घोषणाबाजी आणि टीकेवरही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, आपल्यावर करण्यात आलेल्या घोषणाबाजीला उत्तर देण्याची क्षमता असली तरी, राजकीय संघर्ष वाढू नये म्हणून ते संयम बाळगत आहेत. तसेच आपण मराठी अस्मितेसोबत असून गोरगरीब चालकांच्या हितासाठीच भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण वादामुळे मराठी भाषा सक्तीच्या अंमलबजावणीवरून राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांवर चर्चेला उधाण आले आहे. आता पुढील सरकारी बैठकीत या निर्णयाबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.