चेन्नई,
thalapathy vijays दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि राजकारणात प्रवेश केलेले विजय सध्या केवळ राजकीय यशामुळेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आले आहेत. २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांच्या टीव्हीके पक्षाने दमदार कामगिरी करत राज्याच्या राजकारणात मोठी छाप पाडली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दलही विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
विजय यांच्या पत्नी संगीता सोरनालिंगम या मूळच्या श्रीलंकन तमिळ कुटुंबातील असून त्यांचे बालपण आणि शिक्षण परदेशात झाले. त्या विजय यांच्या चाहत्या होत्या. ‘पूवे उनाक्कागा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी विजय यांची भेट घेतली आणि हळूहळू या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. अखेरीस १९९९ साली दोघांनी विवाह केला. या दांपत्याला जेसन संजय आणि दिव्या साशा अशी दोन मुले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी नेहमीच आपले वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवले असून सार्वजनिक ठिकाणी ते क्वचितच एकत्र दिसतात.
दरम्यान, २०२६ च्या सुरुवातीला विजय आणि संगीता यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांनी जोर धरला. फेब्रुवारी महिन्यात संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त समोर आले. या प्रकरणात वैवाहिक मतभेद, मानसिक त्रास आणि विश्वासघातासारख्या मुद्द्यांचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर विजय किंवा संगीता यांनी अधिकृतरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
यासोबत विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या नात्याबाबतही चर्चा रंगताना दिसतात. तमिळ चित्रपटसृष्टीतील ही जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे. ‘घिल्ली’, ‘तिरुपाची’, ‘आथी’ आणि ‘कुरुवी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली. मात्र ‘कुरुवी’नंतर त्यांनी एकत्र काम करणे थांबवले, ज्यामुळे त्यांच्या नात्याबाबत विविध तर्क-वितर्क लावले गेले.
काही अफवांनुसार, या दोघांमध्ये जवळीक वाढल्यामुळे विजय यांनी त्रिशापासून अंतर ठेवले, असेही म्हटले गेले. मात्र, विजय आणि त्रिशा या दोघांनीही अशा सर्व चर्चांना नकार देत आपले नाते केवळ मैत्रीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.thalapathy vijays एकूणच, विजय यांचे व्यावसायिक आणि राजकीय यश जितके चर्चेत आहे, तितकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा कुतूहलही कायम आहे. मात्र, अधिकृत विधानांच्या अभावामुळे अनेक गोष्टी या केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित असल्याचे दिसून येते.