तालुक्यात 10 दिवसांत 4 शेतकऱ्यांचा मृत्यू

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
वीज प्रवाहसुद्धा पिच्छा सोडेना
 
 
आर्णी, 
Farm laborer dies of electric shock यावर्षी आधीच जिल्ह्यातील शेतकरी नापिकी, कर्जबाजारीपणा, वेळेवर पीक कर्ज न मिळणे, पावसाचे उशीरा आगमन, मालाला भाव नाही, अशा बाबींमुळे त्रस्त आहे. त्यातून सातत्याने शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. तर दुसरीकडे वीज प्रवाहसुद्धा शेतकèयांच्या मागे लागल्यासाखे वाटत आहे. तालुक्यात दहा दिवसात विविध घटनांमध्ये तीन शेतकèयांचा व एक शेतमजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
 
shock
 
लोणी शेतशिवारात शेतकरी सुभाष धोटे शेतात पेरणी करण्यासाठी गेले होते. बोअरवेलचा लोंबकळत असलेला सर्व्हिस केबल लाकडाला बांधण्यासाठी हातात पकडला असता लागलेल्या जोरदार झटक्यात शेतकरी सुभाष धोटे यांचा जागीच मृत्यू झाला. शिवर (भंडारी) येथे शेतकरी दिनेश परसराम जाधव (वय 36) हे शेतातील मोटारीची लाईन बंद करण्यासाठी गेले असताना शेतातील पेटीला त्यांचा स्पर्श झाला. या पेटीत विद्युत प्रवाह सुरू असल्याने दिनेश जाधव यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
तिसèया घटनेत झटका मशिनवर पडलेली विद्यूत तार लक्षात न आल्यामुळे झटका मशिनला स्पर्श करताच आयूष मुंढेचा जागीच मृत्यू झाला. चवथ्या घटनेत जवळा येथील किसन टेकाम हे शेलू ब्राम्हणवाडा शिवारात संजय खंदार यांची शेती वहितिने करत होते. 7 जुलै रोजी शेतात बैलजोडी बांधत असताना विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
मगील काही दिवसात आर्णी तालुक्यातील तीन शेतकèयांचा व एक शेतमजुराचा वीज प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने शेतकèयांनी शेतात जातेवेळी स्वतःच्या जीवाची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाèयाने वीज तारा तुटण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे शेतकèयांसह नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. सतर्क राहून विजेसंदर्भातील उपकरणे हाताळावीत, शेतात, रस्त्यात कुठे तारा पडल्या असल्यास त्यांना स्पर्श करू नये, त्वरित महावितरणच्या अधिकारी, कर्मचाèयांना कळवावे, काळजी घेतल्यास नुकसान होणार नाही व कोणाच्या जीवावर बेतणार नाही.
- प्रवीण फुलझले,
उप कार्यकारी अभियंता, महावितरण, आर्णी.