नवी दिल्ली,
India airlifted citizens सीरियातील असद सरकार पडल्यानंतर आणि बंडखोरांनी सत्ता काबीज केल्यानंतर भारताने तेथे अडकलेल्या आपल्या 75 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा याला दुजोरा दिला. मंत्रालयाकडून निवेदन जारी करून असे म्हटले आहे की - सीरियातील ताज्या घडामोडी पाहता भारताने तिथून आपल्या नागरिकांना एअरलिफ्ट केले आहे. सर्व भारतीय लेबनॉनमध्ये सुखरूप पोहोचले आहेत. ते आता व्यावसायिक विमानाने भारतात परततील.
हेही वाचा : दिल्लीत IMD चा कोल्ड वेव्ह अलर्ट...रात्रीचे तापमान 5 अंशांच्या खाली !
सीरियातून एअरलिफ्ट केलेल्या लोकांमध्ये जम्मू-काश्मीरमधील 44 यात्रेकरूंचाही समावेश असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. हे सर्वजण सईदा जैनबमध्ये अडकले असून त्यांना भारतात सुखरूप आणले जात आहे. भारत सरकार परदेशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देते. India airlifted citizens सीरियामध्ये राहणाऱ्या उर्वरित नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सरकार या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानव कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सीरियातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. देशातील 1.6 कोटींहून अधिक लोकांना मदतीची गरज आहे. 28 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान, केवळ पश्चिम आणि उत्तर-पश्चिम सीरियामध्ये 10 लाख लोक त्यांच्या घरातून विस्थापित झाले आहेत. ज्या शहरांमध्ये बहुतेक लोकांनी आपली घरे सोडली आहेत त्यात अलेप्पो, हमा, होम्स आणि इदलिबचा समावेश आहे.
राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी देश सोडल्यानंतर बंडखोर गटांनी सीरियातील विविध भागांवर ताबा मिळवला आहे. यासोबतच वेगवेगळ्या देशांनी सीरियावर हल्ले केले आहेत.
India airlifted citizens इस्रायलने सीरियाच्या दक्षिणेकडील गोलान हाइट्सचा परिसर ताब्यात घेतला आहे. इस्त्रायली सैन्य आता दमास्कसपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचवेळी अमेरिका, मध्य सीरिया आणि तुर्कस्तानशी संबंधित बंडखोर संघटनांनी उत्तर सीरियाच्या भागात हल्ले केले आहेत.
हेही वाचा : अबब...गुलमर्गमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची गाडी नियंत्रणाबाहेर, VIDEO व्हायरल