महात्मा नको, सेनानी हवाय्...!

Mahatma Gandhi-PM Modi ‘काशी-मथुरा बाकी हैं"

    दिनांक :18-Jul-2024
Total Views |
इतस्तत: 
  
- डॉ. विवेक राजे
Mahatma Gandhi-PM Modi मोहनलाल करमचंद गांधी यांचे पाच वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामनिर्देशन केले गेले. १९३७, १९३८, १९३९ आणि १९४७ व १९४८ असे पाच वर्षे गांधींचे नाव नोबेल पुरस्कारासाठी स्पर्धेत होते. गांधींना नोबेल पुरस्काराने आयुष्यभर हुलकावणी दिली. आपल्याला नोबेल पुरस्कार मिळावा, ही माहात्म्याला इच्छा नक्कीच होती. Mahatma Gandhi-PM Modi स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेदेखील अनेकदा नोबेल पुरस्कारासाठी नामनिर्देशन करण्यात आले होते; पण पुरस्काराने मात्र नेहमीच हुलकावणी दिली. Mahatma Gandhi-PM Modi अनेक ललनांच्या जोडीने तिसऱ्या जगाचं नेतृत्व आणि नोबेल पुरस्कार यांची भुरळ नेहरूंना मरेस्तोवर होतीच होती. भारतातील अनेकांना या आधी वा नंतर नोबेल पुरस्कार प्राप्त झाला असला, तरी भारतीय जनमानसावर प्रभाव असलेल्या या दोन्ही नेत्यांना मात्र नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिलेली दिसते. Mahatma Gandhi-PM Modi पण गांधी आणि नेहरू या दोघांनाही नोबेल पुरस्कार आपल्याला मिळावा, ही आंतरिक इच्छा होती, हे निश्चित! जागांच्या राजकारणात विविध प्रकारांची प्रलोभने विकसनशील देशांतील नेतृत्वाला दाखवली जातात तसेच काही सापळेदेखील लावले जातात. हेही वाचा : रीलचा नाद महागात! मुंबईच्या ट्रैवल इन्फ्लुएंसरचा मृत्यू
 
 
 

Mahatma Gandhi-PM Modi 
 
 
 
ही प्रलोभने वा सापळे त्या नेतृत्वाने स्वराष्ट्र हिताला प्रसंगी बाजूला सारत जगाच्या कल्याणाला (म्हणजे युरोप-अमेरिकेच्या कल्याणाला) प्राधान्य द्यावे म्हणून निर्माण केलेली आहेत. Mahatma Gandhi-PM Modi यापैकी एक म्हणजे नोबेल पुरस्कार. जगाचे नेतृत्व आणि शांततेचा नोबेल पुरस्कार यांची भारतीय नेतृत्वाला नेहमीच भुरळ पडत आली आहे. २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच गोवा अधिवेशनात भाजपाने नरेंद्र मोदी आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार, हे जाहीर केले. त्यावेळी समाजातून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. या तरुण आणि लढवय्या उमेदवाराने मग समस्त भारत पिंजून काढला. दिवसाला चार-सहा सभा घेत अथक परिश्रम करीत नरेंद्र मोदी यांनी एकहाती विजय मिळवत भाजपाच्या पहिल्या पूर्ण बहुमताच्या सरकारची स्थापना केली. Mahatma Gandhi-PM Modi त्यानंतर अथक परिश्रम करीत, योग्य त्या प्रकारे सत्ता राबवत, विविध क्रांतिकारी निर्णय घेत मोदी सरकारने जनतेच्या विश्वासाची पुढील पाच वर्षे सहजपणे मिळविली. १० वर्षांच्या कालावधीत काही वेळा माघार घेत तर काही वेळा धडाडीने पुढे जात एक कार्यक्षम सरकार दिले. कलम ३७० निरस्त करणे, सर्जिकल स्ट्राईक, तीन तलाक प्रथा कायद्याने रद्द करणे, श्रीराम मंदिर उभारणी, सीएए, एनआरसी असे राष्ट्रहिताचे निर्णय घेतले. या देशातील लोकांच्या मनात एक आत्मविश्वास जागवला. हेही वाचा : NEET पेपर लीक प्रकरणाचे धागे एम्सपर्यंत!
 
 
 
Mahatma Gandhi-PM Modi देशाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आता तर आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. या दरम्यान जगातील अनेक भारतविरोधी शक्ती मोदी यांच्या कार्यशैलीचा अभ्यास करीत होत्या, हे निश्चित. भारत हा देश आहे तसाच राहण्यात जागतिक शक्तींना आपला फायदा दिसतो. कारण, एवढी मोठी बाजारपेठ आज जगाच्या पाठीवर दुसरीकडे उपलब्ध नाही. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे लक्ष देशाच्या अग्रक्रमाच्या प्रश्नांवरून अकारण जागतिक प्रश्नांकडे विचलित करणे युरोप-अमेरिकेच्या हिताचे असते. Mahatma Gandhi-PM Modi मग विविध मार्गांनी तुम्ही जगाचे नेते आहात. तुम्ही मध्यस्थी केल्यास अमुक-तमुक लढाई थांबून जागतिक शांतता प्रस्थापित होऊ शकते, अशी आमिषं दाखवली जाऊ लागतात. त्या देशातील भाबड्या जनतेला उगाच आपली छाती फुगवाविशी वाटते. आपला नेता जगाचे नेतृत्व करतोय म्हणून भारावून जायला होतं. आपल्या देशातील प्रश्न जरा कमी टोचतात. पण जगाच्या प्रश्नांमध्ये डोकं खुपसले की आपल्या सत्तेच्या देशांतर्गत उद्दिष्टांना उचित अग्रक्रम देण्यात चालढकल केली जाते. Mahatma Gandhi-PM Modi ही युरोप-अमेरिकेची नेहमीचीच पद्धत आहे. आपलं झाकून ठेवताना ते इतरांचे वाकून पाहायला चुकत नाहीत.
 
 
त्यामुळे आमच्या देशापुढील सध्याच्या आव्हानांचा विचार आणि सोडवणूक अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे. आज या देशातील जनतेला वा भाजपाला विश्वासाने मतदान करणाऱ्या मतदारांना वाढत्या मुस्लिम प्रश्नावर तोडगा हवा आहे. ‘हिंदू-मुस्लिम भाईचारा', ‘गंगा-जमना तहजीब' हे सगळे झूट आहे, हे काळाने सिद्ध केले आहे. हिंदू जनता वक्फ बोर्ड निरस्त होण्याची वाट पाहते आहे. मुसलमानांना काहीही आणि कितीही मोफत दिले तरी ते मतदान हिंदू विरोधी विचारांनाच करतात, हेही या निवडणूक निकालांनी सिद्ध केले आहे. Mahatma Gandhi-PM Modi विरोधी पक्षातील मूर्ख पप्पू या देशाला पुन्हा एका फाळणीच्या वा गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडण्यास उत्सुक आहे. आज लोकसभेतील तुमची ताकद कमी झाली आहे. मागच्या लोकसभेत ती ताकद तुमच्यात असूनही वक्फ बोर्डाला हात लावला गेला नाही. एनआरसी, सीएएची अंमलबजावणी करण्याचा मुहूर्त अजूनही सरकारला सापडत नाही. अफजल गुरूला फाशी देण्याचा मुहूर्त शोधत बसलेल्या मनमोहनसिंग सरकारची या बाबतीत बरोबरी साधण्याची खरोखर गरज आहे का, हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.
 
 
Mahatma Gandhi-PM Modi बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना येथून ताबडतोब देशाबाहेर घालवण्यात यावे, ही सामान्य हिंदू मतदारांची अपेक्षा आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनीवर मुस्लिम समाजाकडून होणारी अतिक्रमणे हा सजग हिंदू मतदारांच्या मनात सलणारा प्रश्न आहे. विविध ठिकाणच्या अवैध मजारी, कबरी, प्रार्थना स्थाने कधी आणि कशी हटणार, याची हा सामान्य हिंदू मतदार वाट पाहतो आहे. सामान्य हिंदू मतदाराला आरक्षण, आयकर, जीएसटी, रोजगार हे जरी जाणवणारे प्रश्न असले, तरी तो याकरिता थांबायला नक्कीच तयार आहे. पण या देशाच्या भूमीवर आणि संस्कृतीवर होणारे आक्रमण तो उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. Mahatma Gandhi-PM Modi ख्रिश्चन चर्चदेखील अनेक भागांत आपला पाया भक्कम करून आहे. लोकांना विविध मार्गांनी प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. तथाकथित अल्पसंख्यक असलेल्या धर्मांना धर्मप्रसाराची खुली सूट देताना बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्मीयांना मात्र धर्म प्रसारास आडकाठी करणारी प्रावधाने निरस्त करणे आवश्यक आहे. या दिशेने कोणतीही हालचाल मागील १० वर्षांत झालेली दिसून आली नाही. अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांवर बांधण्यात आलेल्या मशिदी हा विषय सहिष्णू हिंदू समाजाने कधीच आग्रहाचा केलेला नाही. Mahatma Gandhi-PM Modi पण काशी विश्वनाथ व मथुरेचे कृष्ण मंदिर आजही आमच्या अजेंड्यावर आहे. श्रीराम मंदिर हा फक्त एक टप्पा होय.
 
 
 
‘काशी-मथुरा बाकी हैं' या घोषणेचे सामान्य हिंदू मतदाराला विस्मरण झालेले नाही. सगळे हिंदू कोणत्याही मुद्यावर एकत्र येऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. याची जाणीवही हिंदू मतदाराला आहेच आहे.जगातील कोणत्याही मसिहाला जगात शांतता स्थापित करता आलेली नाही. प्रत्येकच महापुरुषाने फक्त आणि फक्त आपल्या प्रदेशाचा आणि आपल्या लोकांचाच विचार केला, हे इतिहासात डोकावून पाहिले तरी लक्षात येते. Mahatma Gandhi-PM Modi ‘जी-ट्वेंटी'चे अध्यक्षपद महत्त्वपूर्ण असते हे देखील सामान्य माणूस समजू शकतो. पण युक्रेन-रशिया युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करणे, हमास-इस्रायल युद्धात शिष्टाई करणे व यातून नोबेल पुरस्काराने सन्मानित होणे वगैरे निव्वळ दिवास्वप्न होय. नोआखलीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या हव्यासापोटी हजारो हिंदू कुटुंब १९४६ मध्ये माहात्म्याच्या हट्टापायी बरबाद झाली, हेही लक्षात घेतले पाहिजे. मतदारांनी टाकलेला विश्वास अनाठायी जाऊ नये यासाठी देशातील मुस्लिम प्रश्नांवर ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. तेव्हा आजच्या घडीला कुशल हिंदू सेनानीचे नेतृत्व ही देशाची खरी गरज आहे.
९८८१२४२२२४